राजुरा तालुक्यातील कोलगांव वासियांकडून हंसराज अहीर यांचा भव्य नागरी सत्कार






राजुरा तालुक्यातील कोलगांव वासियांकडून हंसराज अहीर यांचा भव्य नागरी सत्कार

◾शेतकऱ्यांनी शेती धंदा जोपासावा…शेतकरी असल्याचा अभिमान बाळगावा - हंसराज अहिर

◾बल्लारपुर वेकोली WCL अंतर्गत धोपटाळा भुमिगत ते खुली खाण प्रकल्पाकरिता ८१० हेक्टर जमीन अधिग्रहीत झाली


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर नॉर्थ वेस्ट प्रकल्पातील, कोलगांव येथील सर्व उर्वरित जमीन प्रकल्पग्रस्तांचे वतीने शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा भव्य नागरी सत्कार दि. १७ मार्च रोजी संपन्न झाला याप्रसंगी माजी आमदार ऑड. संजय धोटे व सुदर्शन निमकर, वाघुजी गेडाम, राजु घरोटे, कोलगांवच्या सरपंच अनिताताई पिंपळकर, उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, मधुकर नरड, अरूण मस्की, संजय पावडे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बल्लारपुर वेकोली WCL अंतर्गत धोपटाळा भुमिगत ते खुली खाण प्रकल्पाकरिता ८१० हेक्टर जमीन अधिग्रहीत झाली ज्यामध्ये धोपटाला, सास्ती, भडंगपूर सह कोलगांव येथील जवळपास २४५ हेक्टर जमीन अधिग्रहण झाली. परंतु उर्वरित ३३७ हेक्टर जमीन शिल्लक राहिली होती व मुळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पातील डम्पिंग व वर्धानदी लागून असल्यामुळे वारंवार निर्माण होणारी पूर परिस्थिती यामुळे उर्वरित जमिनीवर शेती करणे हे केवळ अशक्य होणार होते आणि गावकऱ्यांसाठी सुध्दा ही गोष्ट संभाव्यतः प्राणहानिकारक उरणारी होती विद्यमान उपसरपंच पुरुषोत्तम लांडे व सर्व गावकऱ्यांनी अहीर यांचे समक्ष ही समस्या उपस्थित केली व उर्वरित शेतीचे अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन या दोन्ही समस्या अतिशय ताकदीने लावून धरल्या.

अहीर यांनी उर्वरित शेतजमिनीच्या समस्येला व भविष्यात गावकऱ्यांच्या जीविताला होणारा संभाव्य धोका ओळखून तात्काळ वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. धोपटाला भुमिगत ते खुली खाण हा मुळ प्रकल्पच सेक्शन ९ होऊनही व्यवहार्य ठरत नसल्यामुळे खुप मोठी अडचण या प्रकल्पात आणि गावासाठी निर्माण झाली होती. परंतु शेतकऱ्याचे खरे कैवारी असलेले अहीर यांनी कोल मंत्रायल, कोल इंडिया, वेकोलि मुख्यालय क्षेत्रीय कार्यालय या स्तरावर वारंवार बैठका घेऊन, कॉस्ट प्लसच्या कारणाने अडकलेला मूळ प्रकल्प वेकोलि बोर्डातून पास करवून घेतला. त्यातील आर्थिक मोबदला, नोकरीचे फायदे या गोष्टी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या व सोबतच उर्वरित कोलगांव जमीन अधिग्रहण व गाव पुनर्वसन या विषयासाठी सतत वरिष्ठ पातळीवर बैठका घेऊन बल्लारपूर नॉर्थ वेस्ट या प्रकल्पात ३६० हेक्टर अधिग्रहीत जमिनीत कोलगांव येथील ३३७ हेक्टर जमीन घेण्यास वेकोलिस भाग पाडले.

या भीष्म कार्यासाठी कृतज्ञ शेतकऱ्यांनी अहीर यांचा गावात भव्य मिरवणूकीसह, नागरी सत्कार करून शेतकऱ्यांचे प्रतिक असलेला चांदीचा नांगर, शाल, श्रीफळ आणि भव्य हार घालून सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकातून कोलगांवचे उपसरपंच पुरूषोत्तम लाडे यांनी समस्त गावकऱ्यांसमोर काही वर्षांपूर्वी प्रतिपादन केल्यानुसार, मुळ प्रकल्प यशस्वी करणे, उर्वरित जमीन अधिग्रहण करणे, गावाचे पुनर्वसन करणे या संपूर्ण कार्यासाठी गावाचे वतीने अहीर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

अहीर यांनी यावेळी, मागील २५ वर्षांपासून आपण सतत शेतकऱ्यांसाठी मैदानात असून, भविष्यात देखील पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहण्याचे उद्द्घोषित केले तसेच या जमिनी आपण वडीलोपार्जितरित्या कसत आलेलो आहोत, आपणांपैकी कोणीही व्यापार किंवा सावकारी पध्दतीने जमिनी हडपून मालक झालेलो नाही, आपणा सर्वांची नाळ जमिनीशी जुळलेली आहे. त्यामुळे आपण खरे शेतकरी असल्याचा अभिमान बाळगून गावकऱ्यांनी जरी संपूर्ण शेती अधिग्रहीत झाली असली तरी शेतकरी पुत्रांनी आपले शेतीचे कौशल्य लोप न पावण्यासाठी अधिग्रहणातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात दुसरीकडे शेती घेवून शेतकरी असल्याचा आत्मसन्मान बाळगावा व कृषीप्रधान देशाची सर्वचा सेवा करावी. भविष्यात अधिग्रहीत जमिनीसाठी वाढीव दर मागण्याचे सुतोवाच सुध्दा अहीर यानी केले.

कार्यकमाचे संचालन प्रदीप बोबडे यांनी केले तर यावेळी अॅड. प्रशांत घरोटे व माजी आमदारद्वय अँड. संजय धोटे व सुदर्शन निमकर यांचे सत्कारपर भाषण झालीत.




Post a Comment

0 Comments