बल्लारपुर पेपर मिल कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या





बल्लारपुर पेपर मिल कर्मचाऱ्याची  गळफास घेऊन आत्महत्या

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील  पेपर मिल मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी न्यू कॉलनी मधील क्वार्टर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. एकनाथ मारोती सुरजागडे  वय ५९ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे .

           मिळालेल्या माहितीनुसार, मयत एकनाथ सूरजागडे १६ सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टच्या ड्युटीला केली होती.  त्याच्या सोबत क्वार्टर्समध्ये राहणारे आत्माराम लटारे सोमवारीच भामरागडला गेले होते. 

आत्माराम लटारे हे १९ सप्टेंबर रोजी न्यू कॉलनीतील क्वार्टरमध्ये पोहोचले असता, क्वार्टरला आतून कुलूप होते.  सुरक्षा रक्षकाच्या मदतीने मुख्य दरवाजा बळजबरीने ढकलला असता दरवाजा उघडताच एकनाथ दुसऱ्या खोलीत फासावर लटकलेला दिसला. मृतदेहाची स्थिती पाहता एकनाथने १७ सप्टेंबर रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मृत एकनाथ ची पत्नी आपल्या दोन मुलांसह नागपुरात राहते. आणि ती १६ सप्टेंबर रोजी दुपारी पतीला भेटण्यासाठी बल्लारपूर येथे आली होती. आणि ती १७ सप्टेंबरला नागपुरात परतली. ते १७ सप्टेंबर पासून रजेवर होते. एकनाथ सुरजागडे यांचा आत्महत्येमागील कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.




Post a Comment

0 Comments