शेतकऱ्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या

 



शेतकऱ्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या 

◾चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथील घटना 

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे प्रतिनिधी :  चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथील शेतकरी हरिदास महागू चौखे वय ६० वर्षे शेतातील कडुलिंबाच्या झाडाला सायंकाळी ०५:०० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती गावाकऱ्यांना मिळताच शेतात धाव घेत बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमायला सुरुवात झाली.

याबाबतची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलीस व गावकरी यांनी शव विच्छेद करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे प्रेत दाखल केले व पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments