विसापुरातील शेतकऱ्याच्या गाईवर वाघाचा हल्ला

 







विसापुरातील शेतकऱ्याच्या गाईवर वाघाचा हल्ला

◾बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील घटना 

बल्लारपुर/विसापूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील शेत शिवारात मागील चार दिवसापासून शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले होते. वाघाचा वावर असल्याचे आज शनिवार  दिनांक २०/७/२०२४  रोजी दुपारी १२ वाजता एका शेतकऱ्याच्या गाईवर हल्ला केल्याने स्पष्ट झाले आहे. विसापूर येथील सदाशिव काळे यांच्या शेतात गाईवर हल्ला करून जखमी केले. वनविभागाने शेतात वावर असणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात शेतकऱ्यांना जनावराच्या चराईसाठी कोणतेच क्षेत्र राखीव नाही.परिणामी शेतकऱ्यांना शेतालगत जनावरांना चराईसाठी सोडावे लागत आहे. पूर्वी शेतकरी जनावरांना चराईसाठी नवीन सैनिक शाळा व नवनिर्मित बॉटनिकल गार्डन परिसरात जनावरांना चराईसाठी नेत होते.आजघडीला शेतकऱ्यांना जनावरांना चराईसाठी क्षेत्र शिल्लक राहिले नाही.यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे.

विसापूर येथील शेतकऱ्यांना जनावरांना चराईसाठी जागा नाही. यामुळे जनावरांना जगविण्यासाठी शेतकरी वर्ग वर्धा नदी लगतच्या शेत शिवारात नेत आहे. अशातच शेत शिवारात वाघाचा वावर असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. शनिवारी दुपारी १२वाजता दरम्यान सदाशिव काळे यांच्या शेतात वैरण खात असलेल्या गाईवर वाघाने हल्ला करून जखमी केले. वन विभागाने पीडित शेतकऱ्याला मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments