शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगांनी व न. प.घुग्घूस वॉटर टँकर उपलब्ध करावे : राजुरेड्डी




  शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगांनी व न. प.घुग्घूस वॉटर टँकर उपलब्ध करावे : राजुरेड्डी

घुग्घूस ( राज्य रिपोर्टर ) : घुग्घूस हा जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक शहर असून प्रदूषण व उष्णते मध्ये हा शहर सदैव पुढेंच असतो. आता भीषण उन्हाळा सुरू झाला आहे शहरातील अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झालेली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गरमी पासून संरक्षणासाठी कूलरची अत्यंत आवश्यकता असल्याने त्यासाठी ही पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

शहरातील भीषण टंचाई लक्षात घेता अजून ही वॉटर टँकरची आवश्यकता असल्याने शहर काँग्रेसच्या वतीने एसीसी,लॉयड्स मेटल्स, गुप्ता कोल वॉशरीज, व वेकोली द्वारे प्रत्येकी दोन वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.  तसेच नगरपरिषदेला ही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments