राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल

 



राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 

◾आज  १७ ऑक्टोबर  जाहीर होत आहे.

मुंबई वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) :   राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल यासाठी ठिकठिकाणी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात यावरून कोणाची किती ताकद हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अनेकांचं या निवडणूक निकालाकडे लक्ष लागलं आहे. 



Post a Comment

0 Comments