बल्लारपूर शहरातील 30 वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

 





बल्लारपूर शहरातील 30 वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील दादाभाई नौरोजीं वॉर्डातील सुभाष चन्द्र बोस शाळेलगत राहणाऱ्या दिपक उर्फ गोलू बाबुराव कोठारे वय ( 30 ) वर्षे यांनी आपले राहते घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना आज दुपारी 1:00 वाजता उघडकीस आल्याची माहीती आहे. या संदर्भातील अधिक माहितीनुसार घरी भावंडा सोबत शुल्लक कारणावरून वाद झाल्यामुळे व काही वेळानंतर घरी कुणीच नसल्याची संधी पाहून घरी असलेले वासमोल नावाचे द्रव पदार्थ प्राशन केले या घटनेची माहीती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी वेळ न दवळता संबंधित तरुणाला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले. मात्र सदर युवकाच्या शरीरभर विष पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा निधन झाले. सदर तरुण हा अविवाहित असून मागील काही वर्षांपूर्वी कंत्राटी स्वरूपात विज दिवे दुरुस्तीचे कार्य करीत होता या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.





Post a Comment

0 Comments