बल्लारपूर - वर्धा पॅसेंजरचा नागपूर पर्यंत तर अमरावती - वर्धा ही पॅसेंजर बल्लारपूर पर्यंत चालविण्यासाठी मागणी - हंसराज अहीर


बल्लारपूर - वर्धा पॅसेंजरचा नागपूर पर्यंत तर अमरावती - वर्धा ही पॅसेंजर बल्लारपूर पर्यंत चालविण्यासाठी मागणी - हंसराज अहीर

◾मध्यरेल्वेचे महाप्रबंधक श्री. अनिलकुमार लाहोटी यांची पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर चर्चा केली

 चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे गाड्यांच्या प्रश्नी मध्यरेल्वेचे महाप्रबंधक श्री. अनिलकुमार लाहोटी यांची पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुंबई कार्यलयात भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत बल्लारपूर - वर्धा पॅसेंजरचा नागपूर पर्यंत तर अमरावती - वर्धा ही पॅसेंजर बल्लारपूर पर्यंत चालविण्यासाठी मागणी केली तसेच कोरोना काळापासून बंद असलेली काजीपेठ - मुंबई ( वाया वर्धा ) आनंदवन एक्सप्रेस व काजीपेठ - मुंबई ( वाया आदिलाबाद ) ताडोबा एक्सप्रेस सुरु करून प्रतिदिन करण्यात यावी, काझीपेठ - पुणे एक्सप्रेस आठवड्यातून ३ दिवस व काजीपेठ - नागपूर सवारी गाडी कोरोना कालावधीपासून बंद असल्याने ती पूर्ववत सुरु करण्याकरिता प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्याची सूचना केली. वरील मागण्यांची दखल घेत जीएम यांनी प्रस्ताव तातडीने पाठवू असे सांगितले. ही बैठक सकारात्मक पार पडली.

Post a Comment

0 Comments