बल्लारपूरात तीन दिवस (शनिवार ते सोमवार) पाणी पुरवठा बंद राहण्याचे संकेत

 



बल्लारपूरात तीन दिवस (शनिवार ते सोमवार) पाणी पुरवठा बंद राहण्याचे संकेत 

◾ वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेत गाढ साचला असल्याने बंद राहण्याचे संकेत

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा द्वारे वर्धा नदीवरील पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड वा मोठ्या प्रमाणात गाढ साचला असण्याची शक्यता आहे या कारणास्तव बल्लारपूर शहरात २६ फरवरी, २७ फरवरी व २८ फरवरी २०२२ ला म्हणजे (शनिवार, रविवार व  सोमवार पर्यंत येणाऱ्या तीन दिवसात बल्लारपूर शहराला वर्धा नदीवरून होणारा पाणी पुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे तसेच या दरम्यान वर्धा नदीवरील पाणीपुरवठा योजनेत दुरुस्ती वा साचलेला गाढ काढण्याची प्रक्रिया होईल तरी बल्लारपूर शहरात शुक्रवार ला होणाऱ्या पाणी पुरवठ्या दरम्यान नलग्राहकांनी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा संग्रहित करून ठेवावा तसेच या दरम्यान नागरिकांनी आवश्यक प्रमाणात पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments