बल्लारपूर- राजुरा वर्धा नदी पुलावरून एका वृद्ध महिलेने नदीत उडी टाकून आत्महत्या केली

 



बल्लारपूर- राजुरा वर्धा नदी पुलावरून एका वृद्ध महिलेने नदीत उडी टाकून आत्महत्या केली


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान बल्लारपूर- राजुरा वर्धा नदी पुलावरून एका वृद्ध महिलेने नदीत उडी टाकून आत्महत्या केली असल्याची घटना घडली. तेथील नागरिकांनी वृद्ध महिलेला नदीतून बाहेर काढले असता ती वृद्ध महिला मयत पावली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे कळविली असता पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाले. पण मयत ची ओळख पटली नसल्याने आणि वृद्ध महिलेचा हातावर अस्पष्ट गोदून असल्याने चे दिसून येत असल्याने ओळख पटली नाही ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आव्हान केले आहे की मृत महिलेला कुणी ओळखत असेल किंवा कोणी नातेवाईक असेल तर बल्लारपुर पोलीस स्टेशन चे सपोनि शैलेंद्र ठाकरे याच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे. मृत महिलेचे शव बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments