चंद्रपूरसह राज्यातील २१ महापालिकांना बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

 


चंद्रपूरसह राज्यातील २१ महापालिकांना बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्रातील मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका मध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याचा निर्णय अलीकडे महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडी सरकारने घेतला होता त्यानुसार महापालिका च्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारीही राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे यासाठी मुंबई वगळता राज्यात सगळीकडे बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहे या संदर्भात राज्यातील निवडणूक आयोगाने ठाणे, नवी-मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईदर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, मालेगाव, परभणी, नाशिक, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, या महापालिकांच्या आयुक्तांना तातडीने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचं कार्य सुरू करावे तसेच कच्चा आराखडा तयार होताच याबाबत निवडणूक आयोगास कळवावे अशा प्रकारचे पत्र संबंधित आयुक्तास पाठविण्यास आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे महापालिकांच्या निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्यामुळं नवी-मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कोल्हापूर महापालिकांची एक सदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्यात आली असून यापूर्वी करण्यात आलेल्या एक सदस्यीस प्रभाग रचणे संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सर्व सूचना रद्द करण्यात येत आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन न होणे, प्रारूप प्रभाग रचना विरुद्ध वाढत्या हरकतीची संख्या व न्यायालयीन प्रकरणे यामुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे याकरिता प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोग जाहीर करील.




Post a Comment

0 Comments