ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांच्या उत्पादनांची खरेदी करा

 


ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांच्या उत्पादनांची खरेदी करा

◾दिवाळीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली शेठी यांचे आवाहन

 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खादयपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे याची खरेदी करुन त्यांचा उत्साह आणि उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पदधतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली शेठी यांनी केली आहे.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या परिस्थितीमुळे ग्रामीण उदयोजकांना बाजारपेठेच्या समस्येचा सामना करावा लागला. खरेदीदार नसल्याने स्थानिक स्तरावर अनेक नाविण्यपुर्ण उत्पादनांची विक्री होवू शकली नाही. त्यामुळे येत्या दिवाळीत ग्रामीण भागातील साहित्य खरेदी करुन त्यांचा उत्साह वाढविण्याची अनोखी संधी असल्याचे श्रीमती शेठी यांनी म्हटले आहे.

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात स्वयंसहायता समुह कार्यरत असून, यातील अनेक महिला या नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खादयपदार्थ तयार केले जाणार असून, शासकिय परिसरात या वस्तूंचे स्टॉल लावण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल असे त्यांनी म्हटले आहे. विशेष करुन शासकिय कर्मचारी यांनी आवर्जुन साहित्य खरेदी करावे असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments