बल्लारशाह रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू ,समाज माध्यमाद्वारे पटली ओळख

 

बल्लारशाह  रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू ,समाज माध्यमाद्वारे पटली ओळख 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील शिवाजी वॉर्ड परिसरातून जाणाऱ्या ( WCL ) वेकोलीच्या इंकलाईन च्या अप मार्गावर एका अनोळखी युवकांचा मृतदेह मिळाल्यामुळे शहरात सणसणी पसरली प्रथम माहितीच्या आधारावर पोलिसांनी अनोळखी युवकाचे प्रेत मिळाले म्हणून नोंद केली मात्र समाज माध्यमावर फोटो व्हायरल झाल्यामुळे सदर युवकाची ओळख पटली असून सदर युवक हा बल्लारपूर शहरातील शिवाजी वार्ड निवासी असलेला विकास गिरीधर कोटनांके वय ( 25 ) वर्ष, अशी ओळख पटली आहे गुरुवारच्या सकाळच्या सुमारास बल्लारपूर पोलिसांना माहिती मिळाली की, बल्लारपूर कॉलरी 3/4 फिट कडे जाणाऱ्या रेल्वे च्या अप लाईनवर एका अनोळखी युवकाचे प्रेत असल्याची माहिती मिळाली या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला परंतु समाज माध्यमातून फोटो व्हायरल झाल्यामुळे त्याची ओळख विकासच्या रुपात झाली असून कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली असून या आधारावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन नंतर मृतदेह कुटुंबीयांचा स्वाधीन केला मात्र या युवकांचा मृत्यू कशामुळे झाला की अन्य काही वेगळे कारण आहे या सर्व बाबीचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.








Post a Comment

0 Comments