धक्कादायक घटना : पतीने आपल्या पत्नीचा खून केला

 



धक्कादायक घटना : पतीने आपल्या पत्नीचा खून केला 

बल्लारपूरातील ग्रामीण भागात झाला मर्डर : किन्ही गावातील घटना पतीने केला पत्नीचा खून ! 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : पती-पत्नीचे नाते हे जवळचे नाते म्हणून ओळखले जाते त्यातही प्रेमविवाह करणाऱ्यात या नात्यामध्ये दुरावा होणे ही धक्कादायक बाब आहे बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी यांचा प्रेमविवाह झाला होता व त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक वर्षाची मुलगी सुध्दा या दाम्पत्याला होती. 

    या संदर्भातील अधिक माहितीनुसार कीन्ही गावातील मनोज सुरेश कन्नाके आपली पत्नी सुषमा मनोज कँन्नाके सोबत वास्तव्य करीत होता मात्र या पती-पत्नी मध्ये २ सप्टेंबरला एका क्षुल्लक बाबीवरून वाद झाला या वादात मनोजने आपल्या पत्नीला खूप मारहाण केली या मारहाणीत पत्नीला खूप जखमा झाल्या मात्र या मारहाणीनंतर सुषमा ला प्राथमिक उपचारासाठी बल्लारपूरात आणले गेले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले जिथे सुषमावर तीन दिवस उपचार चाललेत मात्र ५ सप्टेंबरला रात्री १०:१५ च्या सुमारास उपचारादरम्यान सुषमाचा मृत्यू झाला लगेच या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील अरुण नागोबा बुच्चे यांनी बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपी मनोज सुरेश कँन्नाके यांचे विरुध्द भांदवी च्या ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमीझ  मुलानी करीत आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा बल्लारपूर तालुका हादरला असून प्रेमविवाहाचा अंत इतका दुःखद होईल असा कुणी विचारही केला नसेल.










Post a Comment

0 Comments