बल्लारपूर येथील शिवाजी वॉर्डात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू

 

बल्लारपूर येथील शिवाजी वॉर्डात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू

◾६८ वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील 2 दिवसापासून बल्लारपूर शहरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील शिवाजी वॉर्ड येथील श्री संजय राजाराम डुंबेरे यांच्या सा मिल मधील असलेल्या जुन्या गोदामाची भिंत कोसळून बाजूच्या इमारती मधील वास्तव्यास असलेली श्रीमती मिराबाई कटकंदिवार  वय-६८ वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 सूत्राच्या माहितीनुसार सदर घटना आज रात्री 12:30 च्या दरम्यान घडली असून या घटनेचे वृत्त कळताच बल्लारपूरचे तहसीलदार श्री संजय राईचंवार, पोलीस उपनिरीक्षक श्री तिवारी, तलाठी श्री खरुले, श्री अजय मेक्कलवार ज्येष्ठ सहायक, श्री संजय डुंबेरे, श्री विशाल डुंबेरे, सामाजिक कार्यकर्ता व  एनएसडी ची टीम उपस्थित होती. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेच्या पश्चात पती व दोन मुले आहे या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.



Post a Comment

0 Comments